• खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
  • महाराष्ट्र एकीकरण समिती ही मराठी भाषेच्या व संस्कृतीच्या अस्तित्वाच्या लढाईसाठी नेहमी झटत आली आहे. अनेक निवडणुकांमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीशी सीमा भागातील मतदाराने उभे राहून साथ दिली आहे. अलीकडे कर्नाटकी वरवंट्यामुळे मराठी भाषा मागे पडत चालले आहे. तिला जगवण्यासाठी व अखंडपणे ती मातृभाषा म्हणून टिकवण्यासाठी मराठी भाषिकांनी महाराष्ट्र एकीकरण समितीला वेळोवेळी पाठिंबा देऊन जोपर्यंत सीमा प्रश्न सोडत नाही तोपर्यंत झुंज देण्याची ताकद ठेवावी व या लोकसभा निवडणुकीत आपण महाराष्ट्र एकिकरण समितीच्या पाठीशी राहून आपली ताकद दाखवावी असे आवाहन उत्तर कन्नड लोकसभा मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई यांनी विनम्र आवाहन केले. शनिवारी कानापूर शहरात विविध मार्गावरून त्यांची प्रचार रॅली झाली त्यानंतर येथील चौराशी देवी मंदिरासमोर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.

  • कारवार लोकसभा मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार निरंजन उदयसिंह सरदेसाई यांच्या प्रचारासाठी शनिवारी खानापूर शहरात भव्य प्रचार फेरी काढण्यात आली. प्रारंभी शिवस्मारक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर झांज पथकाच्या निनादात शिवस्मारक, स्टेशन रोड, निंगापूर गल्ली- घोडे गल्ली, देसाई गल्ली-,विठोबा देव गल्ली, गुरव गल्ली, पारिश्वाड रोड आदी भागात भव्य प्रचार फेरी काढण्यात आली. फेरीच्या मार्गावर सरदेसाई यांचे फटाक्यांची आतिषबाजी करून आणि फुलांची आतिषबाजी करून स्वागत करण्यात आले. तसेच परिसरातील युवक मंडळांनी पाठींबा जाहिर केला. फेरीच्या सांगता प्रसंगी वाल्मिकी चौक सभा घेण्यात आली सभेच्या अध्यक्षस्थानी तालुका समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई होते.
  • यावेळी किणेकर यांनी सरदेसाई यांच्या प्रचारासाठी काढण्यात आलेल्या फेरीतील गर्दी पाहून खानापूरवाशीयाना समितीची ताकत दिसुन आली आहे. त्यामुळे सरदेसाई याना मोठया प्रमाणात मतदान होईल असा विश्वास असून येणाऱ्या काळात सर्वोच्च न्यायालयात याचिकेला गती मिळणार आहे त्यामुळे मराठी भाषिकांनी समीतीच्या पाठीशी उभे राहून महाराष्ट्र राज्यात जाण्याचे स्वप्न पूर्ण करुन घेण्यासाठी प्रयत्नशील रहावे असे मत व्यक्त केले.
  • तालुका समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी प्रास्तविक केले
  • मध्यवर्ती समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे, ऍड एम जी पाटील, यूवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, सचिव श्रीकांत कदम, माजी सभापती मारुती परमेकर, पांडुरंग सावंत, बाळासाहेब शेलार, देवाप्पा गुरव, रणजीत पाटील, वसंत नावलकर, गोपाळ पाटील, शंकर गावडा, जयराम देसाई आदींनी मनोगत व्यक्त केले.
  • मुकुंद पाटील, रमेश धबाले, ज्ञानेश्वर सनदी, नगरसेवक विनोद पाटील, खानापूर समितीचे उपाध्यक्ष मारुती गुरव, दत्तू कुट्रे कृष्णाचे, सूरज कुडचकर, रामचंद्र गावकर, नागेश भोसले,
  • सुनिल पाटील, अजित पाटील, नारायण पाटील, प्रल्हाद कदम, अर्जुन देसाई, अर्जुन गावडा, उमेश पाटील, शेखर तळवार, पुंडलिक पाटील, सुधीर नावलकर, ऍड केशव कल्लेकर आदी उपस्थित होते.
Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us