
खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी : बालपणीच्या आठवणींना उजाळा देत आम्ही शाळेत सारे या शाळेचे विद्यार्थी, या भावनेने तब्बल 27 वर्षानंतर एकत्र आलेल्या बाल विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनी आपल्या मध्यमवर्गीय वयातही शाळेचा आनंद लुटला. बालपणी शाळेत केलेल्या कुरघोड्याची आठवण, आनंदात बागडलेले दिवस, एकमेकांवर केलेल्या आरोप प्रत्यारोप, गुरुजींनी अभ्यास करण्यासाठी दिलेले छडीचे मार, टोपण नावे, शाळेच्या चार खोल्या मधील केलेल्या दंगामस्त्या या सर्वांची आठवण करून एक दिवसाची शाळा भरवली आणि आनंद द्विगुणित केला. गावातील ज्येष्ठांचा सन्मान, आजी-माजी विद्यार्थ्यांचा, शाळेच्या सेवेत नितांत कार्यरत राहणाऱ्या गावकरी मंडळींचा, ग्रामपंचायत मधील निवृत्त वॉटरमचा निवृत्ती निमित्त सत्कार अशा अनेक उपक्रमांनी एक दिवसाची शाळा भरवली. प्रारंभी छत्रपती शिवरायांना अभिवादन करून जयघोष करण्यात आला. त्यानंतर शाळेच्या प्रांगणात गुरुजनांचे औक्षण करून तसेच पुष्पांजली करून त्यांचे स्वागत करण्यात आले. शनिवारी खैरवाड सरकारी प्राथ.मराठी शाळेच्या १९९७-९८सालच्या इ.७ वीच्या माजी विद्यार्थ्याचा स्नेह मेळावा पार पडला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अध्यक्षस्थानी निवृत्त मुख्याध्यापक अनंत पाटील होते.
तर व्यास पिठावर माजी शिक्षक के.वाय.पाटील,मारूती नाईक,एस व्ही लमानी,सौ.मंजुळा कांबळे,सौ.प्रिया चव्हाण, पी.एच.पाटील, मुख्याध्यापिका सौ.ए.आर.जेटगी, एसडीएमसी अध्यक्ष भुजंग हुंजरे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक माजी विद्यार्थी मंजुनाथ बस्तवाडकर यानी केले. मुलींच्या ईशस्तवन व स्वागत गीताने झाले. तर उपस्थित मान्यवरांच्याहस्ते दिपप्रज्वलन तर ग्राम पंचायत सदस्य रूक्माणा झुंजवाडकर यांच्या हस्ते फोटो पुजन करण्यात आले.
सन १९९७-९८ सालच्या इयत्ता ७ वीचे माजी विद्यार्थी मंजुनाथ बस्तवाडकर, मारूती कोलेकर,परशराम कोलेकर, जोतिबा कोलेकर, देवराज पाटील, विद्यार्थीनी सौ.राणी भुजगुरव, सौ.अनिता जुंजवाडकर, सौ.दीपा पाटील,आदीनी आपल्या आठवणीना उजळा दिला.
नुसतेच शिकू नका! सुसंस्कृत व्हा. त्यामुळे तुम्ही जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल. शिक्षणाबरोबर सुसंस्कृत ही आजची नितात गरज आहे.सुसंस्कृत असाल तुम्ही कुठच मागे पडु शकणार नाही.
आज मातृभाषेकडे पालकांची ओढ कमी होत असुन इंग्रजी शाळेकडे प्रत्येकजन धावत आहे. पण सुसंस्कृत शिक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे.ही खंत आहे.
आपली मराठी भाषा टिकविण्यासाठी ,सुसंस्कृत राहण्यासाठी पालकानी मातृभाषेतुन पाल्या शिक्षण देण्याची गरज आहे.
असे मत बैलूर हायस्कूलचे मुख्याध्यापक समरसिंह पाटील यानी स्नेहमेळव्या प्रमुख वक्ते म्हणून बोलताना व्यक्त केले. यावेळी आजी माजी शिक्षक, माजी विद्यार्थ्याचा,एसडीएमसी सदस्य व पाहुण्यांचा शाल,पुष्पहार,मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी शिक्षक रमाकांत पाटील यानी मराठी शाळा टिकल्या पाहिजेत. यासाठी पालकाना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निवृत्त शिक्षक संजीव वाटूपकर व एम पी गीरी यानी केले.
तर आभार माजी विद्यार्थी जी.एन बावकर यानी मानले.
कार्यक्रमाला आजी माजी विद्यार्थी,पालक ,गावचे नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.