
गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे बोईंग ७८७ हे प्रबासी विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत २४३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. हे विमान अहमदाबाद येथून लंडनला निघाले होते. ते नागरी वस्तीवर कोसळल्याने भूमीवरील अनेकांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे एकंदर मृतांची संख्या बाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या विमानाने अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन गुरुवारी दुपारी १ बाजून ३८ मिनिटांनी लंडनला जाण्यासाठी उड्डाण केले. मात्र, त्यानंतर अवघ्या पाचच मिनिटांमध्ये ते कोसळले. ते आकाशात ६५० फूट उंचीवर होते. चालकाने शेवटच्या क्षणापर्यंत विमान सुरक्षित उतरविण्याचा प्रयत्न केला, पण तो बाया गेला, अचानक विमानात तांत्रिक बिघाड निर्माण झाला असावा, अशी शक्यता आहे.
२३० प्रवासी
या विमानात २३० प्रवात्ती, २ चालक आणि १० कर्मचारी होते. प्रवाशांपैकी १६९ जण भारताचे नागरीक होते. तर ५३ जण ब्रिटनचे, ७ जण पोर्तुगालचे नागरीक होते. १ व्यक्ती कॅनडाचा नागरीक होता. प्रवाशांमध्ये ११४ पुरुष, १० बालके आणि १०६ महिला होत्या, अशी प्राथमिक माहिती देण्यात आती आहे.